राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय तपस यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या त्रासावर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीविरोधकांचा समाचारघेतला होता. मुख्यमंत्री म्हणाले की, आरोप करणारे, ईडीला माहिती देणारे, चौकशी करणारे सारे तुम्हीच असल्याने ही ईडी आहे की, घरगडी, असा प्रश्न पडतो. कुटुंबाची बदनामी करायची, धाडी घालायच्या, मालमत्तांवर टाच आणायची हे शिखंडीचे राजकारण बंद करा आणि मर्दासारखे अंगावर या.
चला मी तुमच्याबरोबर येतो. मला आधी तुरुंगात टाका, मग पुरावे गोळा करा; पण कुटुंबीयांची बदनामी थांबवा, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी विधानसभेत विरोधकांच्या टीकेला जोरदार उत्तर दिले. याच मुद्द्यावरून भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुंबईतील दंग्यात वाचविणाऱ्या शिवसैनिकांना त्रास देऊ नका मला अटक कराअसे छातीठोक सांगणाऱ्या @OfficeofUT कृपया सांगा
पाटणकर
यशंवत जाधव
प्रताप सरनाईक हे कोणत्या दंगलीत मुंबईकराना वाचवत होते?
मुळात बॅाम्बस्फोट करणाऱ्या दाऊदशी मालमत्ता घेणाऱ्या नबाबच समर्थन आपण करत आहात pic.twitter.com/XkGN2sLV6o— Keshav Upadhye (@keshavupadhye) March 26, 2022
“पाटणकर, यशवंत जाधव, प्रताप सरनाईक हे कोणत्या दंगलीत मुंबईकरांना वाचवत होते?” असं म्हणत निशाणा साधला आहे. केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत की “मुंबईतील दंग्यात वाचविणाऱ्या शिवसैनिकांना त्रास देऊ नका. मला अटक करा असे छातीठोक सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंनी कृपया सांगा पाटणकर, यशवंत जाधव, प्रताप सरनाईक हे कोणत्या दंगलीत मुंबईकरांना वाचवत होते? मुळात बॉम्बस्फोट करणाऱ्या दाऊदशी मालमत्ता घेणाऱ्या नबाबच समर्थन आपण करत आहात” असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.