Tuesday, January 31, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

पक्षाशी निष्ठावंत असलेले सगळे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत – ऋतुजा लटके

by Team Global News Marathi
October 15, 2022
in राजकारण
0
ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके आज अर्ज भरणार, शिवसैनिक करणार प्रदर्शन

 

सध्या राज्याच्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. तसेच, आमदार रमेश लटके यांच्या मृत्यूनंतर याठिकाणी पोटनिवडणूक पार पडत आहे. रमेश लटके यांच्या जागी त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके या निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून त्यांना उमेदवारीही देण्यात आली आहे. शुक्रवारी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत ऋतुजा लटके यांनी निवडणुकीचा अर्ज दाखल केला. त्यानुसार आजपासून त्यांच्या प्रचाराला सुरूवात झाली आहे.

यामध्येच माध्यमांशी बोलताना ऋतुजा लटके म्हणाल्या, लोक मला बहुमताने निवडून देतील. ३ तारखेला सर्वकाही स्पष्ट होईल, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. रमेश लटके ज्याप्रमाणे गणपती मंदिराचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरूवात करायचे. तशीच सुरूवात आता आम्ही केली आहे. माझ्या प्रचार सभेला सगळे आपले जुने शिवसैनिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत.

आजपासून हा प्रचार सुरू होतोय. काल अर्ज दाखल करताना लोकांनी मोठी गर्दी केली होती. रमेश लटके यांच्याबाबत लोकांचे असलेले प्रेम आणि निष्ठा माझ्यासोबत कायम असल्याचे यातून दिसले असे त्यांनी सांगितले. पक्षाशी निष्ठावंत असलेले सगळेजण माझ्यासोबत आहेत, हेच आम्हाला ३ तारखेला दाखवून द्यायचे आहे. यासाठी सगळे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. लोक मला बहुमताने निवडून देतील, असा विश्वासही ऋतुजा लटके यांनी व्यक्त केला आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
‘भारत जोडो यात्रेने देशात चैतन्य, महाराष्ट्रात ३८१ किमीचा प्रवास’

'भारत जोडो यात्रेने देशात चैतन्य, महाराष्ट्रात ३८१ किमीचा प्रवास'

Recent Posts

  • यंदाचा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांच्या आशा अन् आकांशा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल
  • २०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वी वरुण गांधीं घेणार मोठा निर्णय
  • उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार ; रामदास कदमांनी पुन्हा साधला निशाणा
  • खासगी टीव्ही चॅनल्सना ‘देशहित’शी संबंधित मजकूर दाखवावा लागणार, केंद्र सरकारचा निर्णय
  • पाणीप्रश्न जिव्हाळ्याचा, या मुद्द्यावर मुख्यमंत्री के.सी. राव यांच्याशी चर्चा करणार

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group