नवी दिल्ली | ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावले नसल्याचं लेखी उत्तर केंद्रातील मोदी सरकारने दिलं आहे.
याच मुद्द्यावरून आता शिवसेना नेते आणि कसदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच केंद्राच्या या विधानावर संताप व्यक्त कला आहे. केंद्र सरकार सत्यापासून दूर पळत आहे. हे सरकार भ्रमिष्ट झालं असून ऑक्सिजन अभावी दगावलेल्यांच्या नातेवाईकांनी केंद्र सरकारवर खटलाच दाखल केला पाहिजे, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसार मद्यमांशी संवाद साधत केंद्रावर जोरदार हल्ला चढवला. ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू झाले नाहीत, असं केंद्र सरकारने लेखी उत्तरात म्हटलं आहे. हे तुम्हाला पटतं का?, असा सवाल राऊत यांना केला. त्यावर राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
यावर बोलताना राऊत म्हणाले की, ज्यांचे नातेवाईक ऑक्सिजन अभावी मेले, जे मेडिकल सिलिंडरसाठी इकडे तिकडे हिंडत होते, त्यांचा विश्वास बसतोय का हे सांगायला हवं. सरकार खोटं बोलत आहे. ऑक्सिजन अभावी अनेक राज्यांमध्ये जे मृत झाले त्यांच्या नातेवाईकांनी सरकारवर खटला दाखल केला पाहिजे. उत्तर लेखी असेल किंवा मौखिक असेल पण सरकार सत्यापासून दूर पळत आहे. हा पेगाससचा परिणाम आहे. सरकार भ्रमिष्ट झालं आहे, असा जोरदार हल्ला चढवला होता.