मुंबई | राजय्त आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष विविध मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर टीका करताना दिसून येत आहेत अशातच राज्य मंत्रिमंडळाची काल बैठक पार पडली होती यामध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घराच्या अनधिकृत बांधकामासाठी ठाणे पालिकेने ठोठावलेला दंड माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयावरुन भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकावर टीका केली आहे. ‘शेतकऱ्यांसाठी पैसे नाही पण आमदाराच्या गैरव्यवहारावर पांघरूण घालण्यासाठी कोट्यवधींची माफी, वा रे वा ठाकरे सरकार,’ अशा शब्दांत उपाध्ये यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
केशव उपाध्ये यांनी नुकतेच ट्वीट करत ठाकरे सरकारने कालच्या मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयावरून निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही कबूल करूनही प्रोत्साहन भत्ता देत नाही. शेतकऱ्यांसाठी पैसे नसतात पण स्वतःच्या आमदाराच्या गैरव्यवहारावर पांघरूण घालण्यासाठी कोट्यवधींची माफी करता. वा रे ठाकरे सरकार,’ अशी टीका उपाध्ये यांनी केली आहे.