मुंबई | हृतिक रोशन आणि कंगना राणौतचा वाद तर सर्वांनाच माहीत आहे.ती नेहमीच हृतिक रोशनवर टिका करत होती. आता पुन्हा एकदा आपला शो ‘लॉक अप’ मधून कंगनाने हृतिक रोशनवर निशाणा साधला आहे. तिने हृतिक रोशनचं थेट नाव न घेता, त्याच्यावर निशाणा साधला आहे. ती जे काही बोलली त्यावरून हे स्पष्ट दिसतं की, तिचा इशारा हृतिककडे आहे.
कंगनाचा शो ‘लॉक अप’ २७ फेब्रुवारी सुरू झाला. डीएनएच्या एका रिपोर्टनुसार, प्रीमिअर दरम्यान कंगना म्हणाली की, तिच्या शोमध्ये अनेक लोक एक्स्पोज होणार असल्याने घाबरत आहेत. यासोबतच ती म्हणाली की, लोकांनी ५ वर्ष तिच्याकडे दुर्लक्ष केलं. पण आता बोलू लागले आहेत. यानंतर ती असं काही बोलली ज्याकडे सर्वांचं लक्ष गेलं.
कंगना म्हणाली की, लोक आपली पाचही बोटं जोडून…हात जोडत आहेत आणि ६ बोटं असलेल्याचा घसा कोरडा पडत आहे. कंगनाने शो च्या प्रीमिअरमध्ये ६ बोटं असलेल्या व्यक्तीचा उल्लेख केला. आता हे तर सर्वांनाच माहीत आहे की हृतिक रोशनला ६ बोटं आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कांगावा आणि हृतिक यांच्यातील वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.