पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजप नेत्या चित्राताई वाघ यांनी थेट शिवसेनेचे नेते मंत्री संजय राठोड यांचे नाव घेऊन गंभीर आरोप केले होते. मंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्यांकडे केली होती. यावर आता भाजपा आमदार निलेश राणे यांनी ट्विट करून ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
जे दिशा बरोबर झाले..
तेच पुजा बरोबर होणार असेल..
तर तो "शक्ती" कायदा.. काय चाटायचा आम्ही?
— nitesh rane (@NiteshNRane) February 12, 2021
राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, जे दिशा बरोबर झाले.. तेच पुजा बरोबर होणार असेल.. तर तो “शक्ती” कायदा.. काय चाटायचा आम्ही? असा टोला राणे यांनी आघाडी सरकारला लगावला आहे.
काही दिवसांपूर्वी सरकारने दिशा कायदा पारित केला होता. या कायद्यामुळे राज्यात होणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटना कमी होतीएल असे सांगण्यात येत होते. मात्र आज मंत्र्यांकडून असे प्रकार घडत असल्यामुळे या दिशा कायद्यामुळे महिलांना न्याय मिळेल का ? असा प्रश्न आज उपस्थित होते आहे.