आर्यन खान क्रुज प्रकरण हे अपहरण आणि खंडणी प्रकरण असल्याचा दावा मलिकांनी केला.मोहीत कम्बोज हाच या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला होता. आता त्यांनी अजून एक खळबळजनक खुलासा केला आहे. शाहरूख खानला पैसे दिल्यामुळे तुला आरोपी बनवू, अशा धमक्या देण्यात आल्याचा खुलासा मलिकांनी केला आहे. याशिवाय जर नवाब मलिकांनी बोलणे बंद केले नाही तर तुझा मुलगा भरपूर वेळ आता राहील, अशा धमक्या देखील शाहरुख खानला देण्यात येत असल्याचा दावा नवाब मलिकांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
नवाब मलिकांनी यावेळी मोहित कंम्बोज हा एनसीबीअधिकारी समीर वानखेडेंचा साथीदार असून तो या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार असल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत केला आहे. पत्रकार परिषदेत नवाब मलिकांनी समीर वानखेडेवर देखील अनेक आरोप केले आहेत. समीर वानखेडे हे एनसीबीच्या चांडाळ चौकडीचे सदस्य असून त्यांना बडतर्फ करण्यात यावं, अशी मागणी त्यांनी यावेळी केलीये.
नवाब मलिकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोहित कंम्बोज यांनी काल त्यांच्यावर लावलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे. मोहीत कंम्बोज यांनी काल नवाब मलिकांवर अनेक गंभीर आरोप लावले होते. किरण गोसावी हा नवाब मलिकांचाच माणूस असून राष्ट्रवादी देखील या प्रकरणात सामिल असल्याचा आरोप कंम्बोज यांनी केला होता.