Tuesday, January 31, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

नवाब मलिकांच्या जामिनावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी

by Team Global News Marathi
November 30, 2022
in मुंबई
0
नवाब मलिकांच्या जामिनावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामिनावरआज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यांना जेल की बेल याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. प्रकृती अस्वस्थ्यामुळं न्यायलयीन कोठडीत असलेल्या नवाब मलिकांवर गेल्या काही महिन्यांपासून कुर्ल्यातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यापूर्वी मलिकांचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला होता. त्यामुळं त्यांना आता दिलासा मिळणार की, त्यांच्या अडचणीत अजून वाढ होणार हे पाहावं लागणार आहे.

नवाब मलिक यांना ईडीनं गोवावाला कंपाऊंडमधील जमीन खरेदीच्या व्यवहारात केलेल्या मनी लॉड्रिंग प्रकरणी अटक केली होती. दाऊद इब्राहिमच्या टोळीसोबत केलेल्या व्यवहारातून दहशतवादाला अर्थसहाय्य केल्याचा आरोपही मलिकांवर करण्यात आला आहे. त्यांच्या जामीनावर आज मुंबई सत्र न्यायालयात सकाळी 11 वाजता सुनावणी सुरु होणार आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना देखील जामीन मिळाला आणि ते तुरूंगाबाहेर आले आहेत. आता नवाब मलिक यांना दिलासा मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हसीना पारकर, सलीम पटेल, 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप आहे. या महिलेने 1999 मध्ये सलीम पटेलच्या नावाने पॉवर ऑफ एटर्नी जारी केली होती. याद्वारे सलीम पटेलकडून या जमिनीवर असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत तोडगा काढणे अपेक्षित होते.

मात्र, पटेलने याचा दुरुपयोग करत हसीना पारकरच्या सूचनेनुसार गोवावाला कंपाउंडमधील जमीन मलिक यांच्या सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विकल्याचा आरोप आहे. मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील जागा भाडेतत्वावर देऊन त्यातून आलेल्या पैशांमधून वांद्रे, कुर्ला येथील फ्लॅट्स आणि उस्मानाबादमधील शेतजमीन खरेदी केली असल्याचा ईडीचा आरोप आहे. तर, नवाब मलिक यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्करांचं निधन

टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्करांचं निधन

Recent Posts

  • यंदाचा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांच्या आशा अन् आकांशा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल
  • २०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वी वरुण गांधीं घेणार मोठा निर्णय
  • उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार ; रामदास कदमांनी पुन्हा साधला निशाणा
  • खासगी टीव्ही चॅनल्सना ‘देशहित’शी संबंधित मजकूर दाखवावा लागणार, केंद्र सरकारचा निर्णय
  • पाणीप्रश्न जिव्हाळ्याचा, या मुद्द्यावर मुख्यमंत्री के.सी. राव यांच्याशी चर्चा करणार

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group