नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापू लागले होते. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेख आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांवर घणाघाती टीका केली होती आता या टीकेला नारायण राणे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ते कणकवली येथे बोलत होते.
यात्रेत काही ठिकाणी मांजर आडवी झाली आणि अपशकून झाले. आता अग्रलेख वैगेरे येत आहेत. आधी आपली मुलं किती पराक्रमी आहेत बघा. संजय राऊत यांनी आधी मालकाची मुलं काय करत आहेत हे पाहावं. संजय राऊत आम्हाला बोलण्यासाठी, माहिती काढण्यासाठी प्रवृत्त करत आहेत असं नारायण राणे म्हणालेत.
कोकणातील जन आशीर्वाद यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. त्यानिमित्ताने नारायण राणेंनी सिंधुदूर्गात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संजय राऊतांमुळे शिवसेनेची अधोगती होत आहे. सामना आणि शिवसेनेची प्रतिमा लोकांमध्ये अजिबात चांगली नाही. समोरासमोर भेटलं की चांगलं बोलायचं आणि फोन आला की ये रे माझ्या मालका. माझ्या मुलांसोबत बरोबरी करु नका. दोघंही हुशार आणि शिकलेले आहेत, असा इशारा नारायण राणेंनी यावेळी दिला.