सध्या राज्यात मंत्री धनंजय मुंडे यांचे रेणू शर्मा प्रकरण शांत होत नाही तोवर मंत्री संजय राठोड यांचे नाव टिकटॉक स्टार पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येशी जोडण्यात आले होते. त्यामुळे विरोधकांनी एकचं टीकेची झोड महाविकास आघाडी सरकारवर उठवली होती. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, चित्रा वाघ यांच्या नंतर आता किरीट सोमय्या यांनी टीका केली आहे
आता त्या पाठोपाठ भाजपा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा आघाडी सरकारला लक्ष करून टीका केली आहे.”राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या तीन बायका आहेत, तरी शरद पवारांनी त्यांना वाचवलं, आता संजय राठोडांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाचवत आहेत. राठोडांना अटक करायला हवी होती, अशी भूमिका सोमय्या यांनी घेतलेली आहे.
सोमय्या म्हणतात की, उद्धव ठाकरे सरकार हे मंत्री चालवतात की माफिया हा प्रश्न आहे. वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा नाही, तर त्यांची हकालपट्टी व्हायला हवी होती. राठोडांना ताबडतोब अटक करायला हवी होती. धनंजय मुंडेंना तीन-तीन बायका, त्यांना शरद पवार वाचवतात. संजय राठोड यांनी २२ वर्षांच्या तरुणीच्या आयुष्याचा सत्यानाश केला आहे, त्यांना उद्धव ठाकरे वाचवतात, असा घणाघाती आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.