महाविकास आघाडी कोसळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झालं.यानंतर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्याला पूर्णविराम मिळाला. दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले असून यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी त्यांना टोला लगावला आहे.
दरम्यान काल राज्यात मुंबईत दहशतवादी हल्ला झाल्यासारखी पोलिस यंत्रणा तैणात करण्यात आली होती. यातून भाजप सत्तेचा कसा गैरवापर करत आहे दिसून आले आहे. देशात भाजप फोडा आणि सरकार स्थापन करा ही निती वापरत आहे त्याला आम्ही देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येत लढा देण्याचे काम करणार आहोत. असे राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून आम्हीच शिवसेना म्हणून व्हिप जारी केला आहे यावर राऊत म्हणाले की शिवसेना पक्ष हा बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. शिवसेना आणि ठाकरे वेगळी होऊ शकत नसल्याचेही ते म्हणाले. शिंदे यांची शिवसेना गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान शिवसेनेचे विधानभवनातील ऑफिस बंद करण्यात आल्याचे मला समजले भाजप सुडाचे राजकारण करत आहे. याचबरोबर आरे कारशेड प्रकरणी सरकार राजकारण करत असल्याचे राऊत म्हणाले.