राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना शनिवार पासून खासदार छत्रपती संभाजी राजे हे आझाद मैदानावर अनोलनाला बसले असून याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यातील वातवरण तापले आहे. अशातच आंदोलनाच्या मुद्दुअवरून भाजप नेते आणि माजी विरोधी पक्ष नेते राधा कृष्ण पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे .
मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करणारेच आता सत्तेत राहून समाजाची फसवणूक करत आहेत. आश्वासनांची पूर्तता करण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आलं आहे. समाजाची उपेक्षा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील मराठा समाजाच्या मंत्र्यांनी तात्काळ राजीनामे द्यावेत,’ अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असून उद्याच मी मुंबईत त्यांची भेट घेणार आहे, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली आहे.
पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, ‘महाविकास आघाडी सरकारने आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाजासह ओबीसी व धनगर समाजाची मोठी फसवणूक केली. या सरकारवर कोणत्याही समाजघटकांचा आता विश्वास राहिलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर १७ जून २०२१ रोजी झालेल्या बैठकीत सरकारने दिलेल्या कोणत्याही आश्वासनाची पूर्तता होऊ शकली नाही. याचा निषेध म्हणून खासदार संभाजीराजे यांना आझाद मैदानवार उपोषणाला बसण्याची वेळ आली.