कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांचा जनता कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही अशा शबदार भाजपा आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. त्यामुळे आता पुन्हा शिवसेना आणि भाजपा असा वाद पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.
तसेच शिवजन्मोत्सवर लादलेल्या निरबंधावर बोलताना शेलार म्हणाले की, शिवजन्मोत्सव हा दिवाळी सणासारखा एक मोठा उत्सव आहे. सरकारने कोरोनासंदर्भात योग्य ती काळजी घ्यायला हवीच मात्र शिवभक्तांचा उत्साह देखील लक्षात घ्यावा. बाकीच्या सगळ्या कार्यक्रमांना गर्दी चालते मग शिवजन्मोत्सावर निर्बंध का?, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे.
पुढे पूजा चव्हाण प्रकरणावर बोलताना शेअर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रियांना माता भगिनींचा दर्जा होता. त्यांचा सन्मान केला जायचा मात्र या सरकारमध्ये एका मंत्र्यांकडून मोठी चूक झालीय.त्या मुलीवर अत्याचार झाल्याचीही चर्चा आहे. पोलीस नीट तपास करत नाहीत. संजय राठोड समोर येऊन खुलासा करत नाहीत. त्यामुळे ठाकरे सरकारकडून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय हे स्पष्ट आहे.