मुंबई | मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावर आपली रोखठोक भूमिका मांडत छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव उचित असल्याचे विधान केले होते.तसेच रस्त्यावर कोण उतरणार हे बघूया, असा इशाराही दिला होता. पण, मात्र आता नवी मुंबईत लाखोंच्या संख्येनं निघणाऱ्या मोर्च्यात सहभागी होणार असल्याची घोषणाच मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याच्या जोरदार होऊ लागणी आहे. ३ दिवसांपूर्वी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. मनसेनं पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली होती. परंतु, राज ठाकरे यांनी वस्तुस्थितीत मांडत नवी मुंबईतील विमानतळ हा मुंबई विमानतळाचा विस्तार आहे, त्यामुळे त्या विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज हेच राहणार आहे, असं सांगितलं होत.
आज महाराजांच्या नावावर चर्चा काय करायची. विमानतळ पहिल्यांदा झालं पाहिजे. आता माझ्या बोलण्यानंतर कोण रस्त्यावर उतरतंय ते बघूया, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला होता. आज नवी मुंबईतील सिडको कार्यालयाला घेराव घालण्यासाठी आंदोलकांनी विराट मोर्च्याचे नियोजन केले आहे. या आंदोलनात मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे सुद्धा सहभागी होणार आहे. या आंदोलनात आपण का सहभागी होते, याबद्दल राजू पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून खुलासा केला आहे.
काय लिहिले आहे फेसबुक पोस्टमध्ये वाचा