मुंबई | मागच्या काही काही दिवसांपूर्वी एनसीबीनं मुंबईमध्ये कारवाई करत ड्रग्ज प्रकरणात मोठा खुलासा केला होता. या प्रकरणात आर्यन खानला अटक झाल्यानंतर तेव्हापासून राज्यात वातावरण तापलं होत. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी यासर्व प्रकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांना चांगलंच घेरलं आहे.
चित्रा वाघ सातत्यानं महाविकास आघाडीवर टीका करत असतात. १५ दिवसाची बाळंतीण आणि ८ महिन्याच्या गर्भवतीवर बलात्कार झालाय. अन् संजय राऊतांची लेखणी महिला संरक्षणाऐवजी भ्रष्टाचाऱ्यांच्या रक्षणासाठी परजतेय. कदाचित उच्च प्रतीच्या गांजाची नशा अजून उतरली नसल्यानं संजय राऊत यांच्यापर्यंत औरंगाबाद महिला अत्याचाराची घटना पोहोचली नसेल, अशी जहरी टीका संजय राऊत यांच्यावर चित्रा वाघ यांनी केली आहे.
संजय राऊत यांनी सोमय्या यांना पत्र लिहून पिंपरी चिंचवडमधील घोटाळा बाहेर काढण्याची विनंती केली होती.तसेच चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना महाराष्ट्रात महिलांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात लिहिणेचे आव्हान केले आहे. आता या टीकेला शिवसेना काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.