मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांची लाट आली आहे. एकापाठोपाठ एक अशा ऐतिहासिक चित्रपटानंतर आता महेश मांजरेकरांनी आणखी एका ऐतिहासिक सिनेमाची घोषणा केली आहे.’वेडात मराठे वीर दौडले सात’ असं या चित्रपटाचं नाव आहे. सध्या चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागली असून या चित्रपटाचे पोस्टर सर्वत्र झळकत आहे.
काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या सिनेमाची घोषणा करण्यात आली आणि घोषणा होताच या चित्रपटाची चर्चा सुरू झाली. या चर्चेला कारण ठरला तो अभिनेता अक्षय कुमार. अक्षयने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
होय, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या महेश मांजरेकरांच्या आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या सिनेमात अक्षय कुमार ( त्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. नेमक्या याच गोष्टीची सर्वाधिक चर्चा आहे. मांजरेकरांची छत्रपती शिवरायांच्या भूमिकेसाठी अक्षयची निवड केली असली तरी नेटकऱ्यांना मात्र ही निवड फारशी आवडलेली नाहीये. त्यामुळे सध्या मांजरेकर आणि अक्षयला ट्रोल केलं जात असून मराठी कलाकार भेटलं नाहीका असा सवाल आता मांजरेकरांना विचारला जात आहे.