Monday, January 30, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

महाराष्ट्र पेटला नाही, तुमची पेटलेली वात विझायला आली, शीतल म्हात्रे यांचा आघाडीचा टोला

by Team Global News Marathi
December 18, 2022
in महाराष्ट्र
0
महाराष्ट्र पेटला नाही, तुमची पेटलेली वात विझायला आली, शीतल म्हात्रे यांचा आघाडीचा टोला

 

महाविकास आघाडीतर्फे राज्यातील विविध मुद्द्यांवर निषेध करण्यासाठी महामोर्चा काढण्यात आला. यावेळी सभेत भाष्य करताना खासदार संजय राऊत यांनी “महापुरुषांचा अपमान करणारे मंत्रालयात बसले असून, हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही.” असे म्हटले होते. त्यावर शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “फेब्रुवारीत शिंदे-फडणवीस सरकार पडणार हा संजय राऊतांना झालेला साक्षात्कार आहे.” असे त्या म्हणाल्या.

शीतल म्हात्रे म्हणाल्या की, “खासदार संजय राऊत हे आता ज्योतिषीपण झालेले आहेत. वेगवेगळ्या भूमिकेत ते शिरत असतात. त्यांना वेगवेगळे साक्षात्कार होत असतात. तसा फेब्रुवारीत शिंदे-फडणवीस सरकार पडणार हा त्यांना झालेला साक्षात्कार आहे. दिवा विझतो तेव्हा त्याची शेवटची फडफड असते. तीच फडफड मोर्च्याच्या रूपात दिसून आली. मुंबई महापालिका आपल्या हातातून जाते की काय? अशी भीती वाटते. मुंबईमध्ये उद्ध्वस्त सेनेचा जीव आहे. मुंबई हातातून गेल्यास मुंबईतील उरलेसुरलेले लोकही राहणार नाहीत. याची त्यांना भीती आहे. म्हणून शक्तिप्रदर्शन करण्याचा हा प्रयत्न होता.” असे त्या म्हणाल्या.

अजित पवारांनी महाराष्ट्र पेटला, असे म्हटले होते. त्यावरही त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “महाराष्ट्र पेटलेला नाही. तुमची पेटलेली वात विझायला आली आहे. हे महाराष्ट्र बघत आहे. निवडणुका आल्या की, महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत. मुंबईचे तुकडे करायचे आहेत, असे सतत बोलत असता. वसुली सरकारला सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर काहीही कामे राहिली नाहीत. हा मोर्चा बेकारांना असलेले काम आहे. स्वतःच्या जीवावर मोठा मोर्चा करू शकत नाही.

हे उद्ध्वस्त सेनेच्या लक्षात आले. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि अनेक पक्षांची कुबडं घेऊन हा मोर्चा त्यांनी पार पाडला.” असेही त्या म्हणाल्या. अंधारेताई या मोर्च्यात का नव्हत्या? त्या संताबद्दल, राम, कृष्णाबद्दल बोलतात. हिंदूंचे देव तुमच्यासाठी महत्त्वाचे नाहीत? त्यांच्याबद्दल बोलले जात नाही. वि. दा. सावरकर हे महापुरुष नव्हते का? त्यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी वादग्रस्त विधान केले. मग, हा महापुरुषांचा अपमान नव्हे का? असा प्रश्नही शीतल म्हात्रे यांनी विचारला.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
”निघून जा नाहीतर तुझं तोंड फोडेल”; कोश्यारींना माफी मागायला लावणाऱ्याला भाजपा कार्यकर्त्यांची दमदाटी

''निघून जा नाहीतर तुझं तोंड फोडेल''; कोश्यारींना माफी मागायला लावणाऱ्याला भाजपा कार्यकर्त्यांची दमदाटी

Recent Posts

  • कोल्हापुरात धक्कदायक प्रकार शिक्षकानेच दाखवलं नववी-दहावीतील मुलींना पॉर्न व्हिडीओ
  • अभिनेत्री राखी सावंत हिच्यासाठी मराठमोळ्या अभिनेत्याची भावुक पोस्ट
  • महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त स्वरा भास्करचं ट्विट, झाली ट्रोल
  • “पुरक वातावरण नसल्यानेच उद्योग आले नाहीत,माझी PMO ला विनंती आहे की..”
  • चंद्रकांत खैरे यांच्या मुलाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वायरल, थेट बदलीसाठी घेतले इतके रुपये

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group