मध्य प्रदेशमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला मान्यता दिली आहे. मध्यप्रदेशमध्ये स्थानिक निवडणुकीत ओबीसी आरक्षणाला मान्यता मिळाल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात अनेक चर्चा रंगताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे,
“मध्यप्रदेशला मा. सर्वोच्च न्यायालयाने OBC आरक्षणाला मान्यता दिली आहे. मग महाराष्ट्राला हा न्याय लागू का होत नाही. मध्यप्रदेशला मागच्या आठवड्यात दिलेला निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने देशभराला लागू केला होता. तसाच आता हा देखिल निर्णय संपूर्ण देशाला लागू करा.”, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत केली आहे.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळं मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने राजकीय वर्तुळात उत्साह दिसून येत आहे. तर इकडे महाराष्ट्रातही यामुळे आशा पल्लवित झाल्या आहेत. यावर आता राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.