उत्तरप्रदेश आणि गोवा विधानसब निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाने आपले संपूर्ण लक्ष मुंबई महानगर पालिका निवडणुकीआकडे केंद्रित केले होते अशातच आता मुंबई महानगर पालिका जिंकण्याचा मानस ठेवणाऱ्या भाजपा नेत्यांना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार टोला लगावला आहे.
राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “उत्तर प्रदेश किंवा चार राज्यांच्या निवडणुकींचा मुंबई पालिकेशी काही संबंध नाही. गेली ५० वर्षांपासून आम्ही मुंबई पालिका लढत आहोत. आणि आणि या महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा आहे, तो कायम राहील.”, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. ते माध्यमांशी संवाद साधत होते.
दरम्यान ‘अभी तो असली लढाई मुंबई में होगी’ आम्हाला मुंबईला कोणत्याही पक्षापासून मुक्त करायचे नाही. आम्हाला मुंबईला भ्रष्टाचारापासून मुक्त करायचे आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात मैदानात उतरलो आहोत. असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकांमुळे राज्यातील वातावरण तापताना दिसून येत आहे.