कोकणासह पश्चिम महाराष्ट्र पडणाऱ्या धो-ढगो पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आते तसेच अनेक ठिकाणी दरडी कोसळून अनेकांना आपला प्राणही गमवावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते आता पूरग्रस्त भागाची पाहणी करत आहे.
राज्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला होता. तर पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत होता. अनेक ठिकाणी पडणाऱ्या या पावसामुळे सर्वच नद्यांनी रौद्र स्वरूप धारण केले होते. या मुसळधार पावसाने राज्यापुढे एक नवे संकट उभं राहिलं आहे.
जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे . दमदार पावसामुळे कोल्हापुरात महापूराची परिस्थिती निर्माण झाली . दरम्यान याकाळात अनेकांनी स्थलांतरही केले . राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले नसतानाही कोल्हापुरात पूरस्थिती बिकट झाली . दरम्यान कोल्हापुरातील पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री जिल्ह्याच्या दौयावर येणार होते. परंतु कोल्हापूरला पावसाचा रेड अलर्ट असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा दौरा रद्द झाला आहे .