ज्यांनी नागपूरची चड्डी घातली तो थेट जॉईंट सेक्रेटरी होतो, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. बुलडाणा इथं आयोजित करण्यात आलेल्या भीमशक्ती मेळाव्यात नाना पटोले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. सध्या देशाची व्यवस्था संपवण्याचं काम सुरु आहे. लोकशाहीच्या चारही स्तंभाना संपवण्याचं काम सुरु असल्याचेही नाना पटोले यावेळी म्हणाले.
सध्या देशाची व्यवस्था संपवण्याचं काम सुरु आहे. लोकशाहीच्या चारही स्तंभाना संपवलं जात आहे. त्यात गोदी मीडिया एक आला, म्हणजे माध्यमाची व्यवस्था त्यांनी संपवली आहे. सुप्रीम कोर्टाचे जजेस माध्यमांच्या समोर येतात आणि म्हणतात, आम्हाला वाचवा…! सुप्रीम कोर्टाचे जजेस आम्हाला वाचवा म्हणतात तर न्याय व्यवस्था ही धोक्यात आली असल्याचे नाना पटोले यावेळी म्हणाले.
प्रशासकीय व्यवस्थेमध्ये कलेक्टर व्हायचं असेल, एसपी व्हायचं असेल, डीएफओ व्हायचं असेल, फॉरेन सर्व्हिसमध्ये जायचं असेल तर तुम्हाला युपीएससीच्या परीक्षा आधी पास करायच्या होत्या. आत्ता त्या युपीएससीच्या परीक्षा नाहीत. तर आत्ता नागपूरची चड्डी ज्यांनी घातली तो डायरेक्ट जॉईंट सेक्रेटरी होतो अशा प्रकारचे चित्र आपण पाहत असल्याचे पटोले म्हणाले. काल रात्री उशिरा खामगावात पार पडलेल्या भीमशक्तीच्या मेळाव्यात नाना पटोले बोलत होते