काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. कोरोना व्हायरस, लॉकडाऊन, भारत-चीन तणाव, शेतकरी आंदोलन यासह विविध मुद्द्यांवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी ह्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे.
“जवान नाही, शेतकरीही नाही, मोदी सरकारसाठी ३-४ उद्योजक मित्रच देव आहेत” असं म्हणत राहुल यांनी जोरदार टीका केली आहे. अर्थसंकल्पात सैनिकांच्या पेन्शन कपातीच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत जोरदार टीका केली होती.
हा अर्थसंकल्प शेतकरी व जवानांच्या हिताचा नसून फक्त उद्योजकांच्या फायद्याचा असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “अर्थसंकल्पात सैनिकांच्या पेन्शनमध्ये कपात. जवानही नाही, शेतकरीही नाही मोदी सरकारसाठी तीन-चार उद्योजक मित्रच देव आहेत” असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
बजट में सैनिकों की पेंशन में कटौती।
ना जवान ना किसान
मोदी सरकार के लिए
3-4 उद्योगपति मित्र ही भगवान!— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 8, 2021