Saturday, September 23, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जनतेच्या पैशानं निवडणुका कशा लढवाव्यात याचं उत्तम उदाहरण म्हणजे मोदींचा अर्थसंकल्प – संजय राऊत

by Team Global News Marathi
February 2, 2023
in मुंबई
0
जनतेच्या पैशानं निवडणुका कशा लढवाव्यात याचं उत्तम उदाहरण म्हणजे मोदींचा अर्थसंकल्प – संजय राऊत

 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बुधवारी यांनी देशाचे अर्थसंकल्प सादर केले. या अर्थसंकल्पावर सत्ताधारी आणि विरोधकांनी आपापले माता मांडले होते तर विरोधकांनी यावर ताशोरे ओढले होते तर सत्ताधाऱ्यांनी तोंडभरून कौतुक अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर घणाघाती टीका केली आहे. जनतेच्या पैशानं २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका कशा लढल्या जातील याचं उत्तम उदाहरण म्हणजे काल सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प आहे, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. ते दिल्लीत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. ज्या मुंबईकडून देशाला सर्वाधिक महसूल मिळतो. त्या मुंबई आणि महाराष्ट्राला बजेटमधून काय मिळालं? अर्थसंकल्प सादर करण्याआधी साऊथ ब्लॉकमध्ये जो गाजर हलवा तयार केला जातो. त्यातील चमचाभर हलवा देखील मुंबईच्या वाट्याला आलेला नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. मुंबईतील खासदारांच्या अनेक मागण्या होत्या. पण त्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं गेलं आहे. मुंबईतील खासदारांच्या हातावर वाटाण्याच्या अक्षता देण्याचं काम भाजपा सरकारनं केलं आहे, असंही ते पुढे म्हणाले.

भारतीय जनता पक्षानं देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचं काम केलं आहे. शेअर बाजारातील पडझडीचा हिशोब भाजपनेच बघावा. देशाचे पंतप्रधान महिन्याभरात दोनवेळा मुंबई दौऱ्यावर येतात. हे सारं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलं जात आहे. पंतप्रधानांनी मुंबईत यावं त्यांचं स्वागतच आहे. पण येताना मुंबईकरांसाठी काहीतरी घेऊन यावं. रिकाम्या हातानं येता आणि झोळी भरुन घेऊन जाता. आजवर हेच मुंबईचं दुर्दैव राहिलं आहे, असंही संजय राऊत म्हणाले

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
अर्थसंकल्पातही ज्यांना केवळ राजकारण दिसते त्यांना आता काय बोलणार

अर्थसंकल्पातही ज्यांना केवळ राजकारण दिसते त्यांना आता काय बोलणार

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group