गोव्यात जे गेल्या वेळी झालं ते यावेळी होणार नाही. गोव्यात कुणालाही बहुमत मिळणार नाही. राज्याबाहेर आम्ही पक्ष नेण्याचा प्रयत्न करतोय. संघर्ष आम्ही करतोय, लोकसभेची निवडणुक सुद्धा आम्ही इतर राज्यांमध्ये लढवू असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेश व गोवा निवडणुकांसंदर्भात केले आहे.
खिचडी बहोत जगह बन सकती है. मतमोजणी पूर्ण झाली अजून, लोकांना नोटाला का मतं द्यावीशी वाटतायत हा प्रश्न सर्वच राजकीय लोकांनी करण्याची गरज आहे. आम्ही पूर्ण काम केलं होतं. उत्तर प्रदेश, गोव्यात आम्ही प्रयत्न केलेत. आदित्य जी देखील आले होते प्रचाराला. ही सुरुवात आहे. आधी धडपड करावी लागते आणि ती आम्ही केली. आता आम्ही थांबणार नाही. आता लोकसभा लढू. सुरुवात केली आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, प्रमोद सावंत यांच्याविषयी नाराजी होती. आम्ही आदित्य ठाकरेंची सभा देखील तिकडे घेतली होती. मात्र, आता अजून चित्र स्पष्ट व्हायला २ वाजतील. बघू काय होते. गोव्यात मागील सारखी परिस्थिती नाही ओढवणार, चिदंबरमांचा मला फोन आलेला. माझं बोलणं झालं. ते गोव्यात आहेत. आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करु. असे राऊत यावेळी म्हणाले