सुशांत मृत्यू प्रकरणी CBI चौकशीवर मुंबई पोलिसांचे महत्वाचे वक्तव्य

सुशांत मृत्यू प्रकरणी CBI चौकशीवर मुंबई पोलिसांचे महत्वाचे वक्तव्य

सिनेअभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या घटनेला सहा महिने उलटले आहे. या प्रकरणात अद्यापही छडा लावण्यात सीबीआयला यश आलेले नाही. या प्रकरणात नक्की काय घडले याचे कोडं उलगडलेले नाही. सुरूवातीच्या काळात मुंबई पोलीस सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास करत होते. त्यानंतर या प्रकरणात राजकीय हस्ताक्षेप होऊन हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले.


सीबीआयच्या तपासातून अनेकविध पैलू समोर आले पण अद्याप सुशांतच्या बाबतीत नक्की काय घडलं? याचे उत्तर सीबीआयने अद्याप दिलेले नाही. याच दरम्यान, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सुशांत प्रकरणातील सीबीआयच्या तपासाबाबत महत्त्वाचे भाष्य केले आहे.

सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत केला जात आहे. मला खात्री आहे की सीबीआयचे अधिकारी लवकरच या प्रकरणाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचतील. या प्रकरणाचा जो निष्कर्ष सीबीआयकडून काढला जाईल तो निष्कर्ष आमच्या तपासाशी मिळताजुळताच असेल.

सर्वोच्च न्यायालयानेदेखील आम्ही केलेल्या तपासाला अतिशय ‘प्रोफेशनल’ तपास असं म्हटलं होतं. त्यामुळे सीबीआय या प्रकरणाचा जो निष्कर्ष काढेल तो आमच्या निष्कर्षासारखाच असेल, असा विश्वास मुंबई पोलिसांनी व्यक्त केला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: