कल्याण | रास्तवराडीचे नेते आणि मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात आता पुन्हा एकदा एका कार्यक्रमात त्यांनी कार्यकर्त्यांना अजब सल्ला दिला आहे. -राज्याच्या जनतेने डोके शांत ठेवण्यासाठी रजनीगंधा पानसुपारी खाण्याचा अजब सल्ला मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
आव्हाड म्हणाले,’मी मुस्लीम बांधवांना तुम्हाला मी विनंती करतो की,डोके गरम करून घेऊ नये त्यांनी शांत राहावे विरोधक तुमची डोके भडकवयाची आहेत. म्हणून तुम्ही डोके शांत ठेवा. तुम्हाला विरोधक भडकवतील त्यात त्यांचा मोठा राजकीय स्वार्थ आहे. मात्र तुम्ही शांत रहा. तुम्हाला सांगतो, डोके थंड ठेवण्यासाठी मांस कमी खा, आणि तोंडात रजनीगंधा, गुटखा, पानमसाला हवे ते ठेवा, मात्र शांत रहा असा सल्ला आव्हाड यांनी दिला आहे.
मंत्री केलेल्या आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तृळात उलट सूलट चर्चा रंगल्या आहे. तर एव्हढाच्या या विधानाचा आता विरोधकांनी भांडवल करून त्यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.