पुणे | स्थानिकांच्या विरोधानंतर देखील पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली होत. या मुद्धयांवरून राजकारण चांगलेच तापू लागले होते. त्यातच स्थानिक आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं होते. आता या घटनेवर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्याच्या घटनेची चौकशी व्हावी. या घटनेवर पुणे महापौरांनी उत्तर द्यावं. आंबिल ओढ्यावरील कारवाई कुणी केली हे सर्वांना माहिती आहे. पुणे महापालिकेत सत्ता कुणाची आहे तर भारतीय जनता पक्षाची. त्यामुळे महापौरांना जर झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी खोचक टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
पुढे बोलताना सुळे म्हणाल्या की, राजकारण हे विचांरांचं असतं. ते लोकांसाठी करायचं असतं. आजपर्यंत तपास यंत्रणांचा वापर आपल्या विरोधकांसाठी करतात हे यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं. यंत्रणांचा गैरवापर आपण पाहात आहोत. शरद पवार साहेबांनाही नोटीस पाठवली होती. राजकारण विचारांचं असावे. मात्र त्यांनी नवी नियमावली यांनी काढली आहे, अशी घणाघाती टीका देखील त्यांनी केली होती.