मुंबई | एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भारतीय जनता पक्षासोबत सतत स्थापन केली होती मात्र आता या बंडानंतर अनेक दिवस वास्तव्यात असलेल्या गुवाहाटीमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत खळबळजनक खुलासा केला आहे.
सहा महिन्यात राज्यात मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विकासाची कामे सुरु केली. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, शिक्षक यांच्यासाठी महत्वाची कामे हाती घेतली. गेल्या अडीच वर्षाच्या काळात जे काही बंद झाले होते त्याला पुन्हा चालना दिली.
विकासासोबत काही कल्चरल कार्यक्रमही व्हायला हवेत. राज्यभरातून मला बोलावणे येतात. पण बाहेर कुठेही स्वागत झाले तरी ठाण्याचे स्वागत लक्षात राहते. आमदार प्रताप सरनाईक यांनी एकट्यानेच संपूर्ण जिल्ह्याचा निधी घेतला आहे.
पण, त्यांनी जी काही कामे सांगितली त्याचा फायदा सगळ्यांनाच होणार आहे. गुवाहाटीला असताना जिथे सांगतील तिथे सह्या करत होतो. पण, आता मुख्यमंत्री झाल्यानंतरही सामान्यांच्या प्रश्नासाठी सह्या करायला तयार असतो असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.