Sunday, March 26, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

गुजरातमधील प्रचारसभेत राहुल गांधींचे भाषण एका व्यक्तीने अचानक रोखले कारण की,

by Team Global News Marathi
November 22, 2022
in देश विदेश
0
“जेएनयूमध्ये सेक्स स्कँडल सुरू, राहुल गांधी, दीपिका पादुकोण तिथे जातात”

 

गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. आता काँग्रेसचे नेते राहुल गांधीही भारत जोडो यात्रेमधून वेळ काढत गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पोहोचले आहेत. सोमवारी राहुल गांधी गुजरातमधील एका प्रचारसभेत भाषण देत असताना त्यांना एका व्यक्तीने अचानक रोखले. त्यामुळे सारेच अवाक झाले.

झाल अस की, राहुल गांधी हिंदीमध्ये भाषण देत होते. तर त्या भाषणाचा गुजराती अनुवाद भरतसिंह सोलंकी करत होते. त्यावेळी या व्यक्तीने भाषण थांबवून राहुल गांधी यांना हिंदीतूनच भाषण सुरू ठेवण्याचा आग्रह धरला. तसेच आम्ही समजून घेऊ गुजराती अनुवादाची गरज नाही, असे सांगितले. राहुल गांधी भाषण करत असताना ही व्यक्ती उभी राहिली आणि म्हणाली. तुम्ही हिंदीतच बोला. आम्ही समजून घेऊ, आम्हाला अनुवादकाची गरज नाही. त्यानंतर राहुल गांधी थांबले आणि त्यांनी मंचावरील नेत्यांना विचारले की हे योग्य ठरेल का. तेव्हा उपस्थित जनतेनेही त्यांना पाठिंबा दिला आणि भाषणामध्ये अनुवादकाची गरज उरली नाही.

सध्या भारत जोडो यात्रेवर निघालेल्या राहुल गांधी यांची गुजरात निवडणुकीतील ही पहिलीच सभा होती. ते सुरत जिल्ह्यातील महुवा येथे उपस्थितांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी आदिवासी हे देशाचे पहिले मालक असल्याचे सांगत भाजपा त्यांचे हक्क हिरावून घेत असल्याचा आरोप केला. भाजपावाले आदिवासींना वनवासी म्हणतात. तुम्ही भारताचे पहिले मालक आहात हे सांगत नाहीत. तुम्ही शहरात राहावं असं त्यांना वाटत नाही. तुमची मुलं शिकून डॉक्टर, इंजिनियर बनावतीत, इंग्रजी शिकावीत असं भाजपाला वाटत नाही.

यावेळी आर्थिक धोरणांवरूनही राहुल गांधी यांनी भाजपावर टीका केली. ते म्हणाले की, सध्याच्या सरकारने देशामध्ये दोन राष्ट्रे तयार केली आहेत. एकीकडे अतिश्रीमंत लोक आहेत. ते काहीही स्वप्नं पाहू शकतात आणि ती पूर्ण करू शकतात. बंदरांपासून विमानतळांपर्यंत खरेदी करू शकतात. दुसरीकडे देशात गरीब आणि मध्यमवर्ग आहे. त्याला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो. जे गरिबीतून बाहेर पडले आहेत. त्यांना पुन्हा गरिबीच्या गर्तेत ढकलण्यात आले आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
नारायण राणेंच्या नावाने कणकवली का ओळखली जात नाही?

नारायण राणेंच्या नावाने कणकवली का ओळखली जात नाही?

Recent Posts

  • राशिभविष्य ; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • एकनाथ शिंदेचा राऊतांना दणका;संसदीय नेतेपदावरून संजय राऊतांना हटवले; कीर्तिकरांची नियुक्ती!
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • भाग्यकांता सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्षपदी सुनिता गाडेकर तर सचिवपदी गणेश शिंदे
  • ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा बार्शीत गुन्हा दाखल

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group