Tuesday, January 31, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

गुजरात जिंकणारच होते, पण दिल्ली-हिमाचलने का नाकारलं? सामनातून रोखठोक सवाल

by Team Global News Marathi
December 11, 2022
in महाराष्ट्र
0
भाजपला १ वर्षात ७५० कोटींच्या देणग्या, तर शिवसेनेकडे लोकांची श्रीमंती – सामना

 

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या ‘रोखठोक’ सदरात गुजरात, दिल्ली, हिमाचलच्या निवडणुकांच्या निकालांवर भाष्य करत भाजपाला डिवचले आहे.
राजकारण एक खेळ आहे. चलाख लोक हा खेळ खेळतात. मूर्ख लोक त्यावर दिवसभर चर्चा करतात. सध्या आपल्या देशात यापेक्षा वेगळे काय सुरू आहे? मोदींनी गुजरात जिंकले. या विजयावरच आता चर्चा सुरू आहे.

भारतवर्ष एकत्र राहावे म्हणून ‘भारत जोडो’ यात्रेवर राहुल गांधी आहेत. त्याच वेळी देशातील दोन राज्यांच्या विधानसभा व दिल्ली महानगरपालिकेचे निकाल लागले. गुजरात सोडले तर दोन ठिकाणी भाजपचा मोठा पराभव झाला. भाजपने गुजरात जिंकले त्यात नवल ते काय? मोदींचे गुजरात दुसरे कोण जिंकणार? पण हिमाचल, दिल्लीत लोकांनी का नाकारले, यावरही चर्चा होऊ द्या !असे म्हणत राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

गुजरातमधील प्रत्येक प्रचारसभेत नरेंद्र मोदी सांगत होते, “हे गुजरात माझे आहे. हे गुजरात मी बनवले आहे,” अशी भावनिक साद व काँग्रेसचे संघटनात्मक फोलपण यामुळे गुजरातवर भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. त्याच वेळी भारतीय जनता पक्षाने जे गमावले त्यावर कोणीच बोलायला तयार नाही. भाजपने राजधानी दिल्लीतील 15 वर्षांची सत्ता गमावली. दिल्ली महानगरपालिकेत भाजप पराभूत झाली.देशाच्या राजधानीतला हा पराभव. त्याच वेळी भाजपची सत्ता असलेले हिमाचल प्रदेश गमावले. काँग्रेसने येथे पूर्ण बहुमत मिळवून भाजपची सत्ता खेचून घेतली.

म्हणजे तीन सामन्यांत भाजप फक्त एके ठिकाणी, गुजरातमध्येच जिंकला. अन्य दोन ठिकाणी ते पराभूत झाले. मोदी-शहांची जादू आपल्या गृहराज्यात चालली, पण प्रत्यक्ष दिल्लीत व हिमाचल प्रदेशात चालली नाही. याआधी ती पंजाबमध्येही अजिबात चालली नाही, पण भाजप फक्त विजयाचा उत्सव साजरा करतो. त्या उत्सवात पराभवाची चर्चा करणे लोक विसरतात. हा मूर्खपणाच आहे,अशा शब्दात राऊत यांनी संताप व्यक्त केला.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
सरकारची प्रतिमा मलिन करण्याची तुकाराम मुंढेंची प्रवृत्ती; आरोग्यमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सरकारची प्रतिमा मलिन करण्याची तुकाराम मुंढेंची प्रवृत्ती; आरोग्यमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Recent Posts

  • यंदाचा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांच्या आशा अन् आकांशा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल
  • २०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वी वरुण गांधीं घेणार मोठा निर्णय
  • उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार ; रामदास कदमांनी पुन्हा साधला निशाणा
  • खासगी टीव्ही चॅनल्सना ‘देशहित’शी संबंधित मजकूर दाखवावा लागणार, केंद्र सरकारचा निर्णय
  • पाणीप्रश्न जिव्हाळ्याचा, या मुद्द्यावर मुख्यमंत्री के.सी. राव यांच्याशी चर्चा करणार

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group