राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा 5 ऑगस्ट रोजी नांदेड दौरा होणार आहे. या दौऱ्यात नांदेडमध्ये स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील दोन वसतीगृहांचं उद्घाटन करणार आहेत. मात्र राज्यपाल राज्य सरकारला न कलावंत या वसतिगृहाचे उदघाटन करणार आहे यावर महविकास आघाडी सरकारने आक्षेप घेतला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपालांच्या या दौऱ्याबाबत चर्चा झाली. विद्यापीठातील कार्यक्रमावर आक्षेप नाही. मात्र, उद्घाटन आणि प्रशासनासोबतच्या बैठकींवर राज्य मंत्रीमंडळात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या बैठका म्हणजे राज्यात दोन वेगळी सत्ताकेंद्र निर्माण करण्याचं काम केलं जात असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. आता मलिक यांच्या या टीकेला दरेकर यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही जिल्ह्यांचा दौरा करण्यात काय गैर आहे? त्यांच्या दौऱ्यामुळं पोटात दुखण्याचं काहीच कारण नाही, असा खोचक टीका प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर केली. तसेच आशिष शेलार यांनी सुद्धा मलिक यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे.
महामहिम राज्यपाल महोदयांनी काही जिल्ह्यांचा दौरा करण्यात काय गैर आहे? त्यांच्या दौऱ्यामुळे पोटात दुखण्याचे काहीच कारण नाही!मा. @nawabmalikncp जी
त्यांच्या दौऱ्यावर राजकीय बोलण्यापेक्षा तुम्ही पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घ्या!
नागरिकांचे प्रश्न लक्षात येतील.— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) August 3, 2021