Monday, January 30, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

गोड अधिक खाताय तयार मधुमेहाबरोबर इतर आजारांनाही आमंत्रण, ‘या’ गंभीर आजारांचा धोका

by Team Global News Marathi
December 25, 2022
in आरोग्य
0
गोड अधिक खाताय तयार मधुमेहाबरोबर इतर आजारांनाही आमंत्रण, ‘या’ गंभीर आजारांचा धोका

 

शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहार, व्यायाम आणि झोप या त्रिसूत्रींचा अवलंब करणे फार आवश्यक आहे. यातील एका बाबतीतही दुर्लक्ष तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि सकस आहार घेण्याची आवश्यकता असते. डॉक्टर सर्वांना आहाराकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला देतात. आहाराकडे दुर्लक्ष केल्यास अनेक गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.

एका रिपोर्टनुसार, अधिक गोड पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सांगण्यात आले आहे. जास्त प्रमाणात गोड पदार्थ आणि साखरेचे सेवन करणाऱ्यांना मधुमेहाचा धोका जास्त असतो, पण साखरेमुळे मधुमेहाप्रमाणे इतर गंभीर आजारांचाही धोका असतो. अधिक गोड खाल्ल्यामुळे हृदयविकार आणि कॅन्सरसारख्या समस्यांचा धोकाही असतो. यामुळे आरोग्य तज्ज्ञ साखरेचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला देतात.

जर तुम्हीही जास्त गोड खाण्याचे शौकीन असाल तर काळजी घ्या आणि वेळीच सावधगिरी बाळगत आहारातील साखरेचं प्रमाण कमी करा. साखरेमुळे तुमच्या शरीराची मोठी हानी होऊ शकते. अगदी सॉस असो किंवा पीनट बटरपर्यंत या सर्व पदार्थांमध्ये साखर असते. हे पदार्थ आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अतिसेवनामुळे लठ्ठपणा आणि टाईप-2 मधुमेह, हृदयविकार यांसारख्या अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे तुमच्या आहारातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे फार महत्वाचे आहे.

लठ्ठपणाचा धोका वाढतो
जास्त वजन किंवा लठ्ठपणा हे अनेक गंभीर आजारांचे कारण मानले जाते. जर तुम्ही जास्त गोड खाण्याचे शौकीन असाल तर सावध व्हा. अभ्यासानुसार संशोधकांना असे आढळून आले आहे की, साखरेचा समावेश असलेल्या गोष्टी वजन वाढण्याचे मुख्य कारण आहे. सोडा, ज्यूस आणि गोड चहा यासारख्या गोड पेयांमध्ये फ्रॅक्टोजचे प्रमाण जास्त असते, यामुळे जास्त भूक लागते. परिणामी तुम्ही अधिक अन्न खाता. यामुळे वजन वाढण्याची समस्या उद्भवते. लठ्ठ व्यक्तींना हृदयविकाराचा धोका जास्त असतो.

हृदयविकाराची समस्या वाढू शकते
अधिक साखरेचे सेवन केल्याने हृदयविकारासह इतरही अनेक रोगांचा धोका वाढतो. संशोधनात असे आढळून आले आहे की, साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या आहारामुळे लठ्ठपणा आणि जळजळ तसेच ट्रायग्लिसराइड्स, रक्तातील साखर आणि रक्तदाबाची पातळी वाढू शकते. यामुळे हृदयविकाराच्या धोका वाढतो.

कर्करोगाचाही धोका वाढतो
संशोधनातअसे आढळून आले आहे की, साखरेचे प्रमाण जास्त असलेले अन्न खाल्ल्याने काही विशिष्ट प्रकारचे कर्करोग होण्याचा धोका देखील वाढू शकतो. साखरेचे पदार्थ आणि शीतपेयांमुळे लठ्ठपणा येतो, यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो.

 

 

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
“माझ्यावर आरोप करणारे वारकरी संप्रदायाचे नव्हे तर मोहन भागवत संप्रदायाचे!”

"माझ्यावर आरोप करणारे वारकरी संप्रदायाचे नव्हे तर मोहन भागवत संप्रदायाचे!"

Recent Posts

  • कोल्हापुरात धक्कदायक प्रकार शिक्षकानेच दाखवलं नववी-दहावीतील मुलींना पॉर्न व्हिडीओ
  • अभिनेत्री राखी सावंत हिच्यासाठी मराठमोळ्या अभिनेत्याची भावुक पोस्ट
  • महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त स्वरा भास्करचं ट्विट, झाली ट्रोल
  • “पुरक वातावरण नसल्यानेच उद्योग आले नाहीत,माझी PMO ला विनंती आहे की..”
  • चंद्रकांत खैरे यांच्या मुलाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वायरल, थेट बदलीसाठी घेतले इतके रुपये

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group