राज्यात गणेशोउत्सवच्या पार्श्वभूमीवर वाढत्या गर्दीला आळा घालण्यासाठी तसेच कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी मुंबईतही जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी पुढील ९ दिवस कलम १४४ लागू केलं आहे. त्यामुळे आता मुंबईत पुढील ९ दिवस सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्रित जण्यास परवानगी नाही. मुंबई पोलिसांकडून आदेश जारी करण्यात आले आहेत.
या आदेशामुळे गणेशोत्सवात कोणत्याही मिरवणुकांना परवानगी नसेल. राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे प्रत्यक्ष मुखदर्शनास प्रतिबंध असल्याने, नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. भाविकांना आता ऑनलाईनच दर्शन घ्यावे लागणार आहे.
राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नवी नियमावली जारी केली आहे. नव्या नियमावलीनुसार भाविकांना मंडपात जाऊन बाप्पाचे दर्शन घेता येणार नाही. तर गणेश मंडळांनी बाप्पाच्या दर्शनाची ऑनालईन तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सोय करुन द्यावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.