Friday, July 1, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकर्‍यांच्या मागण्या ठाकरे सरकारला मान्य करायला लावू – देवेंद्र फडणवीस

by Team Global News Marathi
March 5, 2022
in राजकारण
0
सत्तेची पोटदुखी झालेल्यांना राजकीय औषध मीच देणार, उद्धव ठाकरे यांचा नाव न घेता फडणवीसांना टोला |
ADVERTISEMENT

 

राज्यात अर्थसंकल्पीय अधिववेशनाला सुरवात झाली असून विविध मुद्दयावरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षांनी वेठीस धरले आहे. अशातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट महाविकास आघाडीवर घणाघाती निशाणा साधला आहे.शेतकर्‍यांची वीज बिले माफ करावी, दोन टप्प्यात एफआरपी देण्याचा निर्णय रद्द करून एकरकमी एफआरपी द्यावी, नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, आदी मागण्या विधिमंडळात सरकारला मान्य करण्यास भाग पाडू, असा निर्धार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शुक्रवारी व्यक्त केला.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

भाजपा प्रदेश किसान मोर्चाने शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी काढलेल्या मोर्चाला फडणवीस संबोधित होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, किसान मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अनिल बोंडे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, आ. सदाभाऊ खोत, आ. गोपीचंद पडळकर आदी या प्रसंगी उपस्थित होते.

ADVERTISEMENT

फडणवीस म्हणाले की, आघाडी सरकारने शेतकर्‍यांकडून जुलमी वसुली सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज कनेक्शन तोडली जाणार नाही, अशी घोषणा विधिमंडळात केली होती. मात्र, या घोषणेला हरताळ फासत शेतकर्‍यांकडून पठाणी पद्धतीने वीज बिल वसुली केली जात आहे. आमचे सरकार सत्तेत असताना वीज बिल थकले तरी, शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन कापले नव्हते. लाखो रुपयांची बिले थकविणार्‍या धनदांडग्यांचे कनेक्शन कापण्याची हिंमत न दाखविणार्‍या सरकारने गोरगरीब शेतकर्‍यांच्या मागे वसुलीचा ससेमिरा लावला आहे.

ADVERTISEMENT

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्यासह अजित पवारांना दिलं निमंत्रण

Next Post

संजय राऊतांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Next Post
सरकारचे चारित्र्य हे शेवटी राज्याचे किंवा देशाचे चारित्र्य असते, सामना अग्रलेखातून संजय राऊतांचा आघाडी सरकारला सल्ला

संजय राऊतांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Recent Posts

  • दोनशे बिहारी आणून.’, म्हणत कूकने अभिनेत्री माही विजला दिली धमकी
  • “फडणवीस हे एकनाथ शिंदेंचे उजवे हात, दोघांनी मिळून राज्य पुढे न्यावं”
  • शरद पवारांना इनकम टॅक्सची नोटीस; नेमकं काय आहे कारण?
  • “देवेंद्र फडणवीस ज्युनिअरच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील हे स्वप्नातही वाटलं नाही”
  • आज ईडी चौकशी, तपास यंत्रणांना सहकार्य करणं माझं कर्तव्य, राऊतांचं ट्वीट

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group