Thursday, May 26, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फडणवीसांचा जबाब नोंदवण्यासाठी सायबर पोलीस पथक सागर बंगल्यावर, मंत्री आदित्य ठाकरे म्हणतायत की

by Team Global News Marathi
March 13, 2022
in राजकारण
0
“.मग आमच्याबद्दल बोलता तरी का?”आदित्य ठाकरे यांचा फडवणीसांना टोला
ADVERTISEMENT

 

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांचे सायबर गुन्हे पथक दुपारी १:०० वाजता सागर बंगल्यावर दाखल झाले आहे. सध्या त्यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांना प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली. यावर आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, मी पोलीस प्रक्रियेवर बोलू शकत नाही. पण कायदा आपलं काम करेल. भाजपला नैराश्य आले आहे. याच नैराश्यातून भाजप महाविकासआघाडी सरकारवर आरोप करत आहे. आम्ही केंद्र सरकारप्रमाणे तपास यंत्रणांचा गैरवापर करत नाही, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी काढता पाय घेतला. ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

सध्या सागर बंगल्यावर पोलिसांचे पथक देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवून घेत आहे. पोलीस बदल्यांमधील भ्रष्टाचार प्रकरणाची गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी सायबर गुन्हे पथकाकडून देवेंद्र फडणवीस यांचा प्रश्न विचारले जातील. त्यावर देवेंद्र फडणवीस काय माहिती देणार, हे पाहावे लागेल. मी राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. त्यामुळे मला माहितीचा स्रोत उघड करणे बंधनकारक नाही. मला विशेषाधिकार आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या जबाबातून पोलिसांच्या हाती कितपत माहिती लागणार, याबाबत शंकाच आहे.

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यासाठी सागर बंगल्यावर आलेल्या पोलीस पथकात डीसीपी हेमराज सिंग राजपूत, एसीपी नितीन जाधव आणि दोन पोलीस निरीक्षकांचा या पथकात समावेश आहे. जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरु असताना भाजपचे प्रमुख नेते सध्या सागर बंगल्यावर ठाण मांडून बसले आहेत. तर दुसरीकडे राज्यभरात फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या नोटीशीची भाजप कार्यकर्त्यांकडून होळी केली जात आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

ADVERTISEMENT

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवतोय? तर वाचा सविस्तर

Next Post

“बाहेर पडला की पाऊस अन् टीव्ही लावला की संजय राऊत” – हसन मुश्रीफ

Next Post
महाविकास आघाडीसोबत १९० आमदार! हसन मुश्रीफ यांनी दिले भाजपाला आव्हान

"बाहेर पडला की पाऊस अन् टीव्ही लावला की संजय राऊत" - हसन मुश्रीफ

Recent Posts

  • मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मंत्रालयातील वीज पुरवठा खंडित, कॉम्पुटरसह इत्तर यंत्रणा पडली बंद
  • जे जे अनैतिक आहे, ते काम संजय राऊत करतात, चंद्रकांत पाटलांची टीका
  • छत्रपती संभाजीराजे भाजपवर ऐवढे नाराज का आहेत?;
  • “देशमुख, मलिकांनंतर आता परबांचा नंबर; अनिल परबांनी कपड्यांची बॅग तयार ठेवावी”
  • “केंद्र सरकारकडून व भाजपकडून सूडाच्या भावनेने ईडीच्या साह्याने कारवाया ; संजय राऊतांची प्रतिक्रिया

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group