मुंबई | राज्यत आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधक सतत सरकार पडण्याच्या तारखा जाहीर करत आहेत त्यातचआघाडीच्या अडचणी वाढवण्याचा पुरेपूर प्रयत्न विरोधक करताना दिसून येत आहे. त्यातच दुसारिखे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.
माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. विजया असा की, देहूतील एका कार्यक्रमात मंचावरून एकाने माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला. तेव्हा माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल असं म्हणत पाटलांनी सूचक विधान केलं. या विधानामुळं तर्क-वितर्काना उधाण आलं आहे.
देहूत एका खाजगी दुकानाचे पाटलांच्या हस्ते उद्घाटन पार पडत होते. तेव्हा मंचावरील व्यक्ती वारंवार माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख करत होती. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी हे सूचक विधान केले आहे. पुण्यातील वानवडी सामूहिक बलात्कार प्रकरण, पीडित मुलीवर ठाण्यातही अत्याचार झाल्याचं समोर चंद्रकांत पाटील यांना संभाजी ब्रिगेडच्या युतीच्या संदर्भात विचारले असता ते म्हणाले, भाजप हा पक्ष कोणा एका व्यक्तीचा नाही असे विधान त्यांनी केले आहे.