मुंबई : शिंदे गटातील आमदारांनी मुंबईत यावं, अशी गळ उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनीही घातली. त्याच संदर्भातली एक महत्वाची बातमी आहे. गुवाहाटीतून आमदार निघण्याची शक्यता आहे, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर दिली आहे.
“गुवाहाटीतून आम्ही निघण्याची शक्यता आहे. आता अविश्वास ठराव लगेच होण्याची शक्यता आहे. फ्लोअर टेस्टला कोर्टानं विरोध केलेला नाही. नुसत्या अपक्षांनी मतदान केलं ना, तरी हे सरकार पडणार.
39 लोकांची वेडी आशा का ठेवता. तुम्ही वाट्टेल तसं या लोकांना बोलणार आणि त्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा करणार. दावे खोटे आहेत, एवढ्या मोठ्या लोकांबद्दल काय बोलायचं. मोठी लोकं असं बोलायला लागली, तर काय बोलायचं”, असं केसरकर म्हणालेत.