Wednesday, September 27, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘एक विचाराने प्रश्न सोडविले तरच लोकशाही टिकेल’

by Team Global News Marathi
October 2, 2022
in मुंबई
0
‘एक विचाराने प्रश्न सोडविले तरच लोकशाही टिकेल’

 

बॅ. नाथ पै यांचा लोकशाही प्रणालीवर प्रचंड विश्वास होता. आजही आपल्या देशात लोकशाही टिकून आहे जो घटक विकासापासून दूर असेल, त्याला विकासाच्या प्रक्रियेत आणले पाहिजे. तेथील प्रश्न एका विचाराने सोडविले तरच समृद्ध लोकशाही असलेला देश आणखी बळकट होईल, असे मत माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले.

पवार शनिवारी वेंगुर्ले येथील बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार बाळाराम पाटील, बॅ. नाथ पै यांची नात अदिती पै, शैलेंद्र पै, पद्मश्री परशुराम गंगावणे, बॅ. नाथ पै यांचे मित्र विठ्ठल याळगी, आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, बॅ. नाथ पै गरीब कुटुंबात जन्माला आले. वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले असल्याने आईने छोटी-मोठी कामे करून या सात भावंडांना मोठे केले. काही अंतराने बॅ. नाथ पै बेळगाव येथे गेले. तेथे त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला. त्यांचे सुरुवातीचे आयुष्य पूर्णपणे संघर्षातून गेले. नंतर पुढे ते इंग्लंड येथे गेले आणि तेथील काही आंदोलनात भाग घेतला, अभ्यास केला.

त्यानंतर ते भारतात आले तेव्हा बेळगाव येथून विधानसभा निवडणूक लढले; परंतु पराभूत झाले. मात्र, ते मागे हटले नाहीत. पुन्हा इंग्लंड येथे गेले आणि नंतर जेव्हा पुन्हा इकडे आले, तेव्हा समाजवादी विचारसरणीत सक्रिय सहभाग घेतला. राजापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले आणि त्यांनी प्रगल्भ विचार देशाला दिले आणि ते आजही आपण पुस्तकरूपाने वाचत आहोत, असे ते म्हणाले.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
ठाकरे शिंदे वादात कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची गोकुळमधील नियुक्ती रद्द

ठाकरे शिंदे वादात कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची गोकुळमधील नियुक्ती रद्द

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group