मुंबई : राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवलेला अहवाल राष्ट्रवादीचे नेते, मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी तयार केला आहे असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
आता फडणवीसांनी केलेल्या आरोपांना मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. फडणवीसांनी केलेला हा आरोप हस्यास्पद असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. पत्रकार माध्यमांनी फडणवीसांच्या आरोपासंदर्भात त्यांना विचारले असताना ते बोलत होते.
आव्हाड म्हणाले की, शासकीय अधिकाऱ्यांवर अविश्वास दाखवत त्यांचे खच्चीकरण का करत आहात. ज्या अहवालाचे पहिले पान तुम्ही दाखवत आहात ? त्याच्यावरट कॉन्फेंशियल लिहिले आहे, मग ते कसे फुटले ? हे केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी केले जात आहे. केवळ संशायाचे वातावरण निर्माण करायचे, मंत्र्याची बदनामी करायची, एवढेच त्यांचे चालू आहे. आपण अहवाल लिक केला नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेला अहवाल जितेंद्र आव्हाड यांनी लिहिलेला आहे. असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री कुशाग्र बुद्धीचे देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांचा यामागील हेतू मला कळत नाही. हा हास्यास्पद आरोप आहे. याबद्दल माझ्या मनात शंका नाही.