राज्यात कोरोनाचा उद्रेक : रविवारी 16,620 कोरोना रुग्णांची वाढ
ग्लोबल न्यूज – राज्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग कायम असून, राज्यात आज 16 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. राज्यात आज दिवसभरात 16 हजार 620 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली तर, 50 रुग्णांचा मृत्यू झाला.
आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 23 लाख 14 हजार 413 एवढी झाली आहे. त्यापैकी 21 लाख 34 हजार 072 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 8 हजार 861 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
राज्यात सध्या 1 लाख 26 हजार 231 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात पुणे, नागपूर, ठाणे, मुंबई, औरंगाबाद या जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आज दिवसभरात 50 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आजवर 52 हजार 861 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.31 टक्के एवढा आहे. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.21 टक्के झाले आहे.
राज्यात आज 16620 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 8861 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2134072 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 126231 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.21% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 14, 2021
आजपर्यंत राज्यात 1 कोटी 75 लाख 16 हजार 885 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 23 लाख 14 हजार 413 सकारात्मक आले आहेत. राज्यात 5 लाख 83 हजार 413 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 5 हजार 493 संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.