देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप सुरुच असून सलग चौथ्या दिवशी 4 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली, तर सलग दुसऱ्या दिवशी मृतांचा आकडा 4 हजारांच्या पार पोहोचला. दिलासादायक म्हणजे दिल्ली, मुंबई सारख्या काही मोठ्या शहरांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या घटत असल्याचे दिसून येत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये देशात 4 लाख 3 हजार 738 रुग्ण आढळले असून 4 हजार 92 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 3 लाख 86 हजार 444 रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण रुग्णसंख्या 2 कोटी 22 लाख 96 हजार 414 झाली असून सध्या 37 लाख 36 हजार 648 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत 2 लाख 42 हजार 362 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 16 कोटी 94 लाख 39 हजार 663 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
भारतात गेल्या ८ दिवसांपासून करोनाचे रुग्ण मोठ्या संख्येत दिसून येत आहेत. आठ मे रोजी ४, ०१, ०७८ , सात मे रोजी ४, १४, १८८, सहा मे रोजी ४, १२, २६२, पाच मे रोजी ३, ८२, ३१५, चार मे रोजी ३, ५७, २२९, तीन मे रोजी ३, ६८, १४७, दोन मे रोजी ३, ९२, ४८८ आणि १ मे रोजी ४, ०१, ९९३ इतके नवीन रुग्ण आढळून आले होते.
India reports 4,03,738 new #COVID19 cases, 3,86,444 discharges, and 4,092 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 2,22,96,414
Total discharges: 1,83,17,404
Death toll: 2,42,362
Active cases: 37,36,648Total vaccination: 16,94,39,663 pic.twitter.com/m00jtZZhwY
— ANI (@ANI) May 9, 2021
करोना रुग्णांच्या मृत्युंमध्येही वाढ होत आहे. आठ मे रोजी ४१८७, सात मे रोजी ३९१५, सहा मे रोजी ३९८०, पाच मे रोजी ३७८०, चार मे रोजी ३४४९, तीन मे रोजी ३४१७, दोन मे रोजी ३६८९ आणि १ मे रोजी ३५२३ जणांचा करोना मृत्यू झाला
पॉझिटिव्ह रिपोर्टची आवश्यकता नाही
दरम्यान, केंद्र सरकारने शनिवारी कोरोना रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याच्या नियमांमध्ये बदल केले. त्यानुसार आता रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी चाचणी करणे आणि पॉझिटिव्ह रिपोर्ट दाखवणे आवश्यक असणार नाही. तसेच संशयित रुग्णावरही उपचार केले जातील आणि रुग्णाला औषधे, ऑक्सिजन यासारख्या अत्यावश्यक सेवा देण्यास रुग्णालय नकार देऊ शकणार नाही.