नवी दिल्ली : देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे आज वाढत असलेली रुग्णसंख्या अनेक राज्यांच्या चिंतेत भर घालणारी आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाला रोखण्यासाठी सामूहिक लसीकरचा पर्याय मुख्यमंत्री अरविंद केजरीवर यांनी सुचवला आहे. ते शुक्रवारी प्रसार माध्यमांशी बोलत होते.
केंद्र सरकारने ४५ वर्षांची अट काढून टाकली पाहिजे तसेच, बिगर आरोग्यकेंद्रांवरही लसीकरणाची प्रक्रिया राबवली गेली पाहिजे, अशी सूचना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी केली आहे. दिल्लीत रुग्णसंख्या वाढत असली तरी टाळेबंदीची शक्यता मात्र केजरीवाल यांनी फेटाळली.
आज देशभर करोनाची दुसरी लाट आल्याचे मानले जात असून केंद्र सरकारनेही राज्यांना लसीकरणाला वेग देण्याची तसेच मध्यमवयीन व्यक्तींच्या लसीकरणावर भर देण्याची सूचना केली आहे. शिवाय, सर्वाधिक करोनाबाधित जिल्ह्याापार्श्वत दोन आठवड्यांमध्ये ७५ टक्के लोकांचे लसीकरण करण्याचाही सल्ला दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी सामूहिक लसीकरणाची मागणी केली आहे.