पण बाबर लक्षात ठेव मंदिर पुन्हा बांधले जाईल – कंगना रानौत चा पलटवार

पण बाबर लक्षात ठेव मंदिर पुन्हा बांधले जाईल – कंगना रानौत

सिनेअभिनेत्री कंगना रानौत आणि शिवसेना पक्षातील वाद विकोपाला पोहचला आहे.मी मुंबईत येते कोणाच्या बापाची हिंमत आहे अडवायची असे ट्विट करून तिने उघड उघड शिवसेनेला खुले आवाहन केले होते. त्यातच आत सकाळी तिच्या पाली हिल या मुंबई स्थित कार्यलयावर मनपाच्या अधिकाऱ्यांनी हातोडा चालवला होता याविरोधात आता तिने सेनेची तुलना बबारशी केली आहे.

” मणिकर्णिका चित्रपटांतील पहिला चित्रपट अयोध्या जाहीर झाला, ती माझ्यासाठी इमारत नाही तर स्वतः राम मंदिर आहे, आज बाबर तिथे आला आहे, आज इतिहास पुन्हा पुन्हा राम मंदिर मोडेल पण बाबर लक्षात ठेवा हे मंदिर पुन्हा बांधले जाईल, हे मंदिर पुन्हा बांधले जाईल, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम” असे ट्विट करत नव्या वादाला तोंड फोडले आहे.

दरम्यान, कंगणाचे वकिल रिझवान सिद्दिकी यांनी हायकोर्टाक याचिका दाखल केली तसेच मनपाने आपले सर्व कारभारी माघारी पाठवले आहेत. या कार्रवाहीत तिच्या कार्यलयाचे मोठे नुकसान झाले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: