नवी दिल्ली | भारतीय जनता पक्षाकडून नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा गुरुवारी करण्यात आली. पण, यात भाजप नेते खासदार वरुण गांधी आणि त्यांच्या आई मनेका गांधी यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेले नाहीये. वरुण गांधी मागील काही काळापासून सरकारच्या धोरणांविरोधात आणि आता नुकत्याच झालेल्या लखीमपूरच्या घटनेवरुन सरकारवर टीका करत होते. त्यांच्या याच टीकेचा फटका त्यांना बसला आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज पक्षाच्या ८० सदस्यांची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री अमित शहा आणि राजनाथ सिंह यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त अभिनेते मिथून चक्रवर्ती आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनाही या राष्ट्रीय कार्यकारी स्थान मिळालं आहे.
भाजपने राष्ट्रीय कार्य समितीमध्ये ८० सदस्यांचा समावेश केला आहे. यात रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, डॉ. हर्षवर्धन, एस जयशंकर, गिरीराज सिंह, रमेश बिधुरी, मनोज तिवारी, श्रीपाद नायक, मीनाक्षी लेखी, अनुराग ठाकूर, डॉ जितेंद्र सिंह, पहलादा जोशी, निर्मला सीतारमण, मुरलीधरन, नरेंद्र सिंह तोमर, ज्योतिरादित्य सिंधिया, नरोत्तम मिश्रा, धर्मेंद्र प्रधान, हरदीप सिंग पुरी, सोम प्रकाश, ओम प्रकाश माथुर, गजेंद्र सिंह शेखावत, जसकौर मीना, जी किशन रेड्डी, स्मृती इराणी, मुख्तार अब्बास नकवी, संतोष गंगवार, साध्वी निरंजन ज्योती, मिथुन चक्रवर्ती, अनिल जैन, संजीव बाल्यान, दिनेश त्रिवेदी, अनिर्बन गांगुली इत्यादींचा समावेश आहे.