मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले होते. त्यात भाजपा नेत्यांनी यावर उलट-सुलट विधान करून आघाडीत फूट पडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी भाष्य करत भाजपचा समाचार घेतला आहे.
राष्ट्रवदीचे अध्यक्ष शरद पवार आणि अमित शहा यांच्या भेटीच्या वृत्तात कोणतेही तथ्य नाही. साखर उद्योगातील कॉन्फरन्ससाठी शरद पवार अहमदाबादला गेले होते. मात्र त्यावरून चुकीच्या बातम्या पसरवण्याचं काम भाजप सतत करत आहे. आमची आघाडी तोडण्यासाठी भाजप हे करत आहे, असे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केले.
जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप जवळ जाणार नाही. आमची विचारधारा वेगळी आहे म्हणून पवार साहेबांनी महाविकास आघाडी स्थापन केली. त्यामुळे भेटीच्या या चर्चांमध्ये अर्थ नाही. महाविकास आघाडी भक्कम आहे, असे सांगतानाच त्यांनी भाजपला कोरोनाचे काही पडले नाही. काही झालं तरी आम्ही सत्तेत कसं यावं याकडे त्यांचं लक्ष आहे, अशा शब्दांत भाजपवर टीका केली.