राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधक सतत महाविकास आघाडीवर टीका करताना दिसून येत असून दुसरीकडे एका जाहीर सभेत भाजपा नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीचे २५ आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होताया दाव्यामुळे एकच नव्या चर्चेला उधाण आले होते आता या दाव्याला आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे.
राऊत म्हणाले की, रावसाहेब दानवे यांना जितके मी ओळखतो, तितके ते भांग पीत नाहीत असं मला माहित आहे किंवा दुसरी कोणती नशा करत नाहीत. रावसाहेब दानवे यांना कदाचित १२५ बोलायचं असेल स्लीप आँफ टंग झाली असेल. संपर्कात असतील तर घ्या ना, थांबला कशाला होळी संपली आहे. कालची नशा उतरली असेल काल काय बोललो हे त्यांना आज आठवणार नाही. आम्ही असं बोललो तर भाजपाचे ५० आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि आहेतच असा दावा त्यांनी केला आहे.
दानवे म्हणाले की, राज्यातील मतदारांनी भाजपा-शिवसेनेला कौल दिला असताना शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हाच त्यांच्यातला भगवा रंग संपुष्टात आला. आता त्यांनी हिरव्याचं पांघरुण घेतलं आहे. त्यामुळे आता ते हिरव्याचं समर्थन करतात. भगव्याचं समर्थन करत नाही असं सांगत रावसाहेब दानवेंनी महाविकास आघाडीतील अनेक आमदार नाराज असून ते आपल्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला.