बिहारने थकलेल्या मुख्यमंत्र्यासाठी तयार रहावे’’जदयूचे माजी नेते प्रशांत किशोर यांची टीका

नितीश कुमार यांनी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावर जदयूचे माजी नेते आणि रणनितीकार प्रशांत किशोर यांनी टीका केली आहे. नितीश कुमार हे भाजपने बसवलेले आणि थकलेले मुख्यमंत्री आहे अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली आहे.

प्रशांत किशोर यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ‘‘प्रशांत किशोर हे भाजपने बसवलेले मुख्यमंत्री आहेत, त्यांचे अभिनंदन. बिहारने थकलेल्या मुख्यमंत्र्यासाठी तयार रहावे’’ असेही किशोर यांनी म्हटले आहे.

प्रशांत किशोर हे राजकीय रणनितीकार आहेत. त्यांनी जदयूमध्ये जाहीर प्रवेश घेऊन आपल्या राजकीय जीवनाची सुरूवातही केली होती. प्रशांत किशोर हे जदयूमध्ये क्रमांक दोनचे नेते होते. नंतर प्रशांत किशोर आणि नितीश कुमार यांच्यात मतभेद निर्माण झाले. प्रशांत किशोर यांनी हे मतभेद चव्हाट्यावर मांडत जदयूवर टीका केली होती. तेव्हा नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांना पक्षातून काढून टाकले होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: