Big Breaking | केंद्राकडून कंगनाला Y दर्जाचं सुरक्षा कवच

Big Breaking | केंद्राकडून कंगनाला Y दर्जाचं सुरक्षा कवच

नवी दिल्ली, 07 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतशी व्यक्तिगत भांडण नाही आहे. तिनं मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी (POK) केली आहे. महाराष्ट्रचा, मुंबईचा अपमान करणारा कोणी असेल, मुंबईला पाकिस्तान म्हणण्याचा कृत्य हे अत्यंत गंभीर आहे. कंगनाला 9 तारखेला येऊ द्या, एअरपोर्टवर तिचं शिवसेना स्टाईलमध्ये समाचार घेतला जाईल, असा थेट इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

“मी काल भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या भूमिकेचे वाचन केले. भाजपा नेते आशिष शेलार यांनी म्हटले की कंगना राणौतने मुंबईला अक्कल शिकवायची गरज नाही. आशिष शेलार यांनी हे अधिक आक्रमकपणे बोलले पाहिजे, हा महाराष्ट्र त्यांचा सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे एका पक्षाचे नाही, एका जातीचे नाहीत तर देशाचे आणि महाराष्ट्राचे आहेत. अशा शिवरायांच्या महाराष्ट्रावर एखादी व्यक्ती अशा प्रकारे घाणेरड्या शब्दांत टिप्पण्णी करत असेल तर विषय एका राजकीय पक्षाचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे, ” असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, कंगनाने देखील संजय जी, ९ सप्टेंबरला भेटूच…..जय हिंद, जय महाराष्ट्र! असा व्हिडिओ पोस्ट करून संजय राऊत आणि शिवसेनेला खुलं आव्हान दिलं आहे.

मात्र केंद्र सरकारने देखील कंगनाला Y दर्जाची सुरक्षा दिल्याचं वृत्त एएनआय दिल्याने शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केंद्रीय पातळीवरून सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कंगनाच्या वडिलांनी हिमाचल प्रदेश सरकारला पत्र लिहून तिला केंद्राकडे विनंती करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर जलदगतीने हालचाली झाल्याचं म्हटलं जातं.

ग्लोबल न्युज नेटवर्क: