भारताला २५ वर्षांत मुस्लीम राष्ट्र करण्याचा ‘पीएफआय’चा डाव

 

सिमी या दहशतवादी संघटनेवर बंदी आणल्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने (पीएफआय) देशभरात जाळे पसरवले. तसेच पुढील २५ वर्षांत म्हणजेच २०४७पर्यंत भारतात हिंसाचार पसरवून मुस्लीम राष्ट्र स्थापन करण्याचा त्यांचा डाव असल्याची खळबळजनक माहिती यंत्रणेला मिळाल्याचे निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाती देशांतून पीएफआयला मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या फंड मिळत होता, याची ईडीकडे माहिती होती. या फंडाच्या माध्यमातून पीएफआय दक्षिण व उत्तर भारतात दंगली घडविणे तसेच राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये हत्या करून जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसले.

तसेच पाटनामध्ये त्यांच्या कॅम्पवर केलेल्या कारवाईत यंत्रणेला महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली होती. त्यात भारतात हिंसाचार घडवून २०४७पर्यंत मुस्लीम राष्ट्र स्थापन करण्याचे लक्ष्य होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे येत्या काळात पीएफआयवर केंद्र सरकारने बंदी आणल्यास आश्चर्य वाटायला नको, असेही दीक्षित यांनी सांगितले.

Team Global News Marathi: