Friday, September 22, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

औरंगाबाद नामांतराला विरोध करण्यासाठी १२ जुलै रोजी मूक मोर्चा;

by Team Global News Marathi
July 9, 2022
in महाराष्ट्र
0
औरंगाबाद नामांतराला विरोध करण्यासाठी १२ जुलै रोजी मूक मोर्चा;

 

औरंगाबाद जिल्ह्याचा नामांतराला विरोध करण्यासाठी 12 जुलैला शहरातील भडकल गेट ते आमखास मैदानापर्यंत मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती नामांतर विरोधी कृती समितीकडून देण्यात आली आहे.तर या मोर्च्यात तब्बल पन्नास हजार मोर्चेकरी सहभागी होणार असल्याचा दावा सुद्धा कृती समितीकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शहराप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिक सुद्धा या मोर्च्यात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नामांतरविरोधी कृती समितीचे समन्वयक अय्युब जहागीरदार, गौतम खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद नामांतरविरोधी संघर्ष समितीच्या वतीने 12 जुलै रोजी दुपारी 2 वाजता भडकल गेट ते आमखास मैदानापर्यंत मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार तोंडावर काळी पट्टी बांधून, हातात तिरंगा झेंडा घेऊन हा मोर्चा निघेल.

तसेच आमखास मैदानावर सभा पार पडेल. यासाठी 50 हजार मोर्चेकरी जमा होण्याची शक्यता असल्याचा अंदाज कृती समितीने वर्तवला आहे. तर या कृती समितीच्या अध्यक्षपदी खासदार इम्तियाज जलील यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा औरंगाबाद नामांतराच्या मुद्दयावरून राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद जिल्ह्याचे नवा बदलून संभाजीनगर करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यापूर्वी मंत्रीमंडळाची बैठक घेतली होती. ठाकरे यांनी आपल्या या शेवटच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत काही महत्च्वाचे निर्णय घेतले होते. ज्यात औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यांच्या याच निर्णयानंतर नामांतराचा मुद्दा आणखी एकदा चर्चेत आला आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
‘आमदार व्हायची लायकी होती का? तुमचं राजकीय करिअर संपलंय कारण..’,

'आमदार व्हायची लायकी होती का? तुमचं राजकीय करिअर संपलंय कारण..',

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group